आधी बोलायचो कोकणी माणूस येवा कोकण आपलाच असा..
पण मुंबईकरांनो या रोगात तुम्ही घरात बसा..
तुमचे आऊस बापुस.असतत गावाक ..
त्यांच्या वयाचा तरी जरा विचार करा..
आणि
गाववाले पण काय काय असे वागतात.जसे दुश्मन इले..
अरे विसरलात या चाकरमान्या मुळे कोकणात चांगले दिवस इले.
७० हजार लोकांनी काढले बोलतत कोकणात जायचे पास..
पण कळत नाही त्यांका आपल्या मूळे होतलो कोकण नापास..
गाव वाल्यांका सांगतंय पावणे नाहीत ते..
कामाक मुंबई क गेलास की आठवतात हे.
आपलीच पोरा शिकुक तर कोण कामक मुंबईक गेली
आता तुम्ही बोलतात रोग घेऊन इली
आधी बोलायचो कोकणी माणूस येवा कोकण आपलाच असा..
पण मुंबईकरांनो या रोगात तुम्ही घरात बसा..
मुंबईकर पण ऐकत नाही.. घरात बसुक सांगितल्यानी आहे
यांची पहिली गाडी काडून घ्या. यांका सगळीकडे गावात फिरायचा आहे..
अरे हॉस्पिटल डॉक्टर एवढी सुखसुविधा नाही गावात .. तांदळाची पेज पितात ते सर्दी खोखला तापात..
आजारी पडल्यावर तुम्ही .. कुठे पळायचा ह्यांनी
आपल्या पोर बाळांची काळजी म्हणून अडवला तुमका त्यांनी
मान्य आहे कोण खाज म्हणून जात नाही गावात..
पैसे संपले इथे.आता नाही थांबत शहरात..
१० बाय १० मध्ये राहणारे .मुंबईक त्यांना वाटता भिती
म्हणून आठवता प्रत्येकास आपली गावची माती
हकलऊ नका रे वेशिवरून त्यांका..
आपलेच भावकितले ते. अडचणीत मदत करा
आयुष्भर ठेवतील लक्षात तुमका
आधी बोलायचो कोकणी माणूस येवा कोकण आपलाच असा..पण मुंबईकरांनो या रोगात तुम्ही घरात बसा..
जे आता इले गावाक त्यांची काळजी घ्या...
जे वेशीवर आहेत त्यांना इज्जत द्या..
ज्यांना नाही मिळालं जायला त्यांनी नाराज होऊ नका..
तो वरचो बघता हा आपल्याकडे. हा आपल्या पाठीशी
गणपतीक जायाचा गावक .. त्या तयारीला लागा